योग हे अनुभवाधिष्ठ शास्त्ररौप्य महोत्सवीनिमित्त योग संमेलनात मान्यवरांचा सूर

Spread the love

योग हे अनुभवाधिष्ठ शास्त्ररौप्य महोत्सवीनिमित्त योग संमेलनात मान्यवरांचा सूर

विश्व योगदर्शन’ आयोजित योग संमेलनास देशभरातून अनेक दिग्गजांची उपस्थिती

मनाला संतुलित ठेवण्यासाठी योग साधना आवश्यक आहे. आयुष्य साक्षी भावाने जगता आले पाहिजे. कर्मयोगी जीवन आणि सत्याच्या शोधात प्रत्येक माणसाने असावे. त्याचबरोबर, पंचमहाभूतांचे संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य होय. आणि वैयक्तिक योगा पेक्षा सामूहिक योगा’ ही आजच्या काळाची गरज आहे. असे अभ्यासपूर्ण चिंतन पंचवीसाव्या योग संमेलनात अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

सांगली येथे संपन्न झालेल्या विश्वयोग दर्शन’ च्या रौप्यमहोत्सवी वर्षातील योग संमेलनाचे उदघाट्न, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संचालक डॉ. रश्मी रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवसीय योग संमेलनात डॉ. दुर्गादास सावंत, प्रदीप घोलकर यांचा शुद्धी क्रिया कार्यक्रम, डॉ. विजय श्रीनाथ यांचे स्वनदर्शन व योग याविषयीं व्याख्यान झाले. डॉ. शरदचंद्र भालेकर यांचे योग आणि विज्ञान यावर तर डॉ. अजित ओक यांनी योगाभ्यास आणि वैराग्य यांविषयी आपले विचार मांडले. त्याचबरोबर, डॉ. श्रीराम आगाशे यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून योगाची महत्वपूर्ण चिकित्सा सांगितली. डॉ. बाळकृष्ण चिटणीस यांच्या चक्र बिजाक्षर ध्यानाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. जन्मजात योगी असलेले डॉ. ओमानंद गुरुजी यांनी सामूहिक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून, प्राणायाम उपचार पद्धतीचा अविस्मरणीय अनुभव देऊन सर्वांना नवी चेतना दिली.

यावेळी, योग फिलोसॉफर डॉ. बाळकृष्ण चिटणीस यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. योगाचा अभ्यास मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण व्हावा या दृष्टीकोनातून, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, पोष्टर स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्व योग केंद्राच्या रौप्यमहोत्सवानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. संपूर्ण भारत भरातून अनेक तज्ञ् मार्गदर्शक, योग गुरु, योग शिक्षक, साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रौप्य महोत्सवी योग संमेलनाचे स्वागत विश्वयोग दर्शन केंद्राच्या अध्यक्ष जयश्री मदन पाटील यांनी केले. प्रस्ताविक कार्याध्यक्ष डॉ. बाळकृष्ण चिटणीस यांनी केले. संमेलन यशस्वी होण्यासाठी सौ. प्रतिभा पोरे, सौ. प्रणोती पिसे, श्री. विक्रम पाटील, श्री. अजय पवार, श्री. लक्ष्मण गरुड, डॉ. आनंद लिमये, श्री. अमोल दांडेकर, श्री. महेश कराडकर, श्री. हर्षद गाडगिळ, श्री. हितेश भाटे, प्रा. दत्तात्रय जोशी यांनी मेहनत घेतली.

सौ. अंजली चिटणीस यांनी योग संमेलनाचे महत्वपूर्ण निवेदन करून योग संमेलनाचा दर्जा अधिक उंचावला. प्रा. महादेव ठोंबरे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *