मिरजेत डॉ. सुरेश भाऊ खाडे शिष्यवृत्ती प्रदान सोहळा उत्साहात संपन्न.

Spread the love

मिरजेत डॉ. सुरेश भाऊ खाडे शिष्यवृत्ती प्रदान सोहळा उत्साहात संपन्न.

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-

महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त Shriyash Education and Training Institute, Miraj येथे आयोजित डॉ. सुरेश भाऊ खाडे शिष्यवृत्ती प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्रमुख श्री विठ्ठल एडके यांनी केले.प्रास्ताविकात बोलताना श्री. एडके म्हणाले की, “गेल्या १४ वर्षांत संस्थेने एकूण ११४९ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून, त्यापैकी १३५ विद्यार्थी यशस्वीपणे उद्योजक बनले आहेत, तर १०१४ विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वीपणे नोकरी करत आहेत.

देशाला आज कौशल्यविकासाची नितांत गरज आहे. उद्योगांना हवे असलेले कौशल्य आजच्या शिक्षण पद्धतीत नाही, ही गरज लक्षात घेऊनच आमची संस्था विविध उद्योगाभिमुख कोर्सेस राबवत आहे.”या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ५५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५००० रुपये हप्त्याचे एकूण ₹२,७५,००० चे धनादेश मा. सुमनताई खाडे यांच्या हस्ते संस्थेला प्रदान करण्यात आले. या शिष्यवृत्तीचा खर्च डॉ. सुरेश भाऊ खाडे स्वतःच्या निधीतून करीत असून, गरजू विद्यार्थ्यांच्या ५०% फी माफ करून त्यांना सक्षम करत आहेत.

विद्यार्थ्यांचे मनोगत:या योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही शिष्यवृत्ती आमच्यासाठी स्वप्नपूर्तीसारखी आहे. इतके उत्कृष्ट प्रशिक्षण देते की, आम्हाला नोकरी शोधावी लागत नाही तर नोकऱ्या आमच्यापर्यंत पोहोचतात.

संस्थेच्या प्रशिक्षणामुळे आमचे भविष्य उज्ज्वल झाले आहे.”मान्यवरांचे विचार:कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सुमनताई खाडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्री. नितीन (राजेश) देशमाने, योजना समन्वयक धनंजय कुलकर्णी, हे मान्यवर उपस्थित होते.श्री. देशमाने म्हणाले, सुरेश भाऊंनी आपला मतदार संघ असा विचार न करता पूर्ण जिल्हाभरातून येणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून खऱ्या अर्थाने एक आदर्श घालून दिला आहे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.

“संघाच्या संस्कारातून तयार झालेले श्री विठ्ठल एडके यांनी संस्थे मार्फत १०० ते १५० तरुणांचे व्यवसाय उभे करून एक अविश्वसनीय कार्य केले आहे. ही संस्था केवळ व्यवसायिक प्रशिक्षण देत नाही तर विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारे बाळकडू देते, हे कौतुकास्पद आहे.”धनंजय कुलकर्णी यांनीही आपल्या मार्गदर्शनात संस्थेचे विशेष कौतुक केले.

डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अत्यंत निस्वार्थीपणे समाजाचा विचार करून तुकाराम महाराजाप्रमाणे आपली संपत्ती समाजासाठी ओपन करून खूप मोठा आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “शिक्षण घेत असताना आई-वडिलांची सेवा आणि काळजी हेच खरे संस्कार आहेत. संस्था ही जबाबदारी विद्यार्थ्यांत रुजवते.”विद्यार्थ्यांच्या सेवेत कार्यरत शिक्षक मंडळी:कार्यक्रमास संस्थेच्या विविध विभागांचे प्रमुख व समन्वयक देखील आवर्जून उपस्थित होते.

त्यामध्ये इलेक्ट्रिशियन विभागाचे शंकर बिराजदार, कम्प्युटर विभाग प्रमुख ऋषिकेश पाटील, अकाउंट विभागाच्या शुभांगी बेडगे, विद्यार्थी समन्वयक सायली कोरे व आरती हजारे यांचा समावेश होता.गुंडेवाडी गावचे माजी सरपंच आनंदराव गडदे व इतर मान्यवरांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.विद्यार्थ्यांच्या भावना:अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा मन:पूर्वक आभार मानत असे सांगितले की, “प्रत्येक पगाराच्या दिवशी ‘भाऊ’ आठवतील. कारण त्यांच्यामुळेच आम्ही आज शिक्षण घेऊ शकलो.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नाना हलवाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुमारी शुभांगी बेडगे यांनी केले.यावेळी संस्थेचे विविध कोर्स चे एकूण १६८ विद्यार्थी व पालक होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *