
आनंदाची बातमी! रेल्वेत ६ हजार पदांसाठी भरती, २८ जूनपासून २८ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळ (आरआरबी) ने तब्बल ६ हजार पदांसाठी नोकर भरती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने या भरती मोहिमे अंतर्गत संपूर्ण भारतात ६ हजार १८० पदांसाठी अर्ज मागविले आहेत.

या पदांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया येत्या २८ जून २०२५ पासून सुरू होणार असून २८ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत १८० पदे ही तंत्रज्ञ ग्रेड १ सिग्नल या पदांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तर बाकीची ६ हजार पदे ही तंत्रज्ञ ग्रेड ३ पदासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत भरती पोर्टल www.rrbapply.gov.in यावर देण्यात आली आहे.
