

सांगली पेठ नाका रोडवर अपघातात वाढ :
अनेकांचा बळी सांगली पेठ नाका रस्ता होणार कधी….?
वृत्तवेग न्यूज नेटवर्क:
वर्षभरापासून सांगली-पेठ मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे.मात्र या मार्गाच्या कामाच्या विस्कळीत नियोजनाचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. रस्ताकामामुळे वाहतुकीत बदल करत असताना योग्य ताळमेळ नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावले नसल्याने अपघात होत आहेत.
सांगलीवाडी ते आष्टापर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे. कॉक्रिटचा रस्ता असल्याने वाहने वेगाने धावत असतात. डिग्रज-तुंगच्यादरम्यान दिशादर्शक, सूचना फलक नसल्याने झालेल्या अपघातातील वाहन,रस्त्याचे काम सुरू आहे.या ठिकाणी सूचना फलक नसल्याने वाहनावर नियंत्रण राखणे मुश्किल होते, रस्ता पूर्ण झाल्याने वाहने वेगाने जातात आणि अचानक कच्चा रस्ता लागल्याने वाहन धारकांची तारांबळ उडते.
असाच प्रकार मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला, ऊस वाहतूक करणारा रिकामा ट्रॅक्टर व ट्रॉली सांगलीकडून आष्टा मार्गे कडे जात असताना अचानक कच्चा रस्ता लागताच या वाहनाची गती कमी झाली. इतक्यात मागून येणारे भाजीपाला वाहतूक करणारे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते ट्रॉलीला धडकले. धडक एवढी जोरदार होती, की हे वाहन तीस ते चाळीस फुटापर्यंत फरफटत जाऊन पलटी झाले. याचबरोबर सांगलीवाडीजवळ एका कार्यालयासमोरील अर्धवट कामाच्या ठिकाणी दुचाकीला मागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले, तर दुचाकी त्या वाहनाच्या चाकाखाली चक्काचूर झाली. यात हे दाम्पत्य मात्र सुदैवाने बचावले