
मिरजेतील आरोग्य पंढरीतील वानलेस हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा २५ मे रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडणार.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे
मिरज- मा.ना.रामदासजी आठवले साहेब (सामाजिक न्याय व अधिकार राज्य मंत्री भारत सरकार ) आणि सांगली जिल्हा पालक मंत्री मा. ना.चंद्रकांत दादा पाटील तसेच मा. खा. विशालदादा पाटील व मा. अनुपदादा सेटीया ( chairman North east indigenous people fourm and formar General secretery ULFA) तसेच मा. आमदार भाई जगताप (सरचिटणीस भा. का. क महासंघ ) आणि सांगली जिल्ह्यातील सर्व मा. आमदार माजी खासदार, माजी आमदार यांच्या हस्ते वॉनलेस हॉस्पिटल मिरज या 131 वर्षांपासून सर्वसामान्य जनतेला माफक दरात आरोग्य सेवा देणाऱ्या हॉस्पिटलचे पुन्हा एकदा उदघाट्न दिनांक 25 मे ला होत आहे. याचा मला मनापासून आनंद होत आहे.

खरे पाहायला गेले तर हे हॉस्पिटल जुलै 1894 रोजी सर विल्यम वॉनलेस यांनी स्थापन केले होते. भारतातील पहिले मिशनरि हॉस्पिटल म्हणून या हॉस्पिटल चा इतिहास आहे. सर विल्यम वॉनलेस हे मिरज हुन कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आरोग्य उपचार करण्या साठी सायकलवरून जात होते. महाराजांनी सर विल्यम यांचे आरोग्य सेवा बघून या हॉस्पिटल साठी वीस एकर जमीन बहाल केली होती. हा ही एक इतिहास या हॉस्पिटलचा आहे.पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील काही जिल्ह्यातील जनता मोठ्या प्रमाणात या हॉस्पिटलची परवडणारी आरोग्य सेवा 2022 पर्यंत घेत होते. पण अचानक व्यवस्थापनातील गैरकारभारामुळे हे हॉस्पिटल कामगारांनी त्यांचे वेतन मिळाले नाही म्हणून 2022 पासून बंद केले आणि हॉस्पिटलला टाळे लावले साधारण 550 कामगार इथे काम करत होते.गेली तीन वर्षे कामगारांची प्रचंड ससेहोलपट झालेली होती. यातून काहीही मार्ग निघत न्हवता. काही विघ्नसंतोषी लोक कामगारांना आणि व्यवस्थापनातील काही पदाधिकाऱ्यांना चुकीचा मार्ग दाखवून हे हॉस्पिटल कसे विकता येईल आणि त्याचे पैसे कसे खाता येतील याचाच विचार करत होते. हॉस्पिटल ची एकूण जमीन सत्तेचाळीस ( 47 ) एकर आहे. मिरज शहरामधील मुख्य चौकात असलेली जमीन ही आजच्या भावा नुसार हजारो करोड रुपयाची आहे. यामुळे अनेक व्यावसायिकांचे लक्ष या जमिनीकडे लागलेलं होते. पण कामगारांची एकजूट त्यांचा निर्धार आणि कामगारांचे सर विल्यम वॉनलेस यांच्यावर असलेलं प्रेम यामुळे कोणालाही काहीही साध्या करता आले नाही.
एखादी संस्था किंवा कंपनी बंद पडली कि त्या ठिकाणी एक ही वस्तू पाहायला मिळत नाही. सर्व लुटालूट होऊन फक्त खंडर तयार होते. पण येथील कामगारांनी त्यांचे पंचवीस कोटी (25) रुपये थकीत असतानाही कोणत्याही वस्तूला साधा स्पर्श ही केला नाही. ही बाब आजच्या जमान्यात खुप महत्वाची आहे. हॉस्पिटल मध्ये लाखो काही करोडो रुपयांच्या मशिन्स आहेत. पण तीन वर्षांपूर्वी जशा होत्या आजही तशाच आहेत. म्हनुन मला या कामगारांचे मनापासून कौतुक करावसे वाटते. कामगारांची हॉस्पिटल सोबत असणारी चांगली भावना खुप उच्च कोटीची आहे. केवळ यांच्यामुळेच आज हे हॉस्पिटल दिमाखात उभे आहे. अनेक व्यावसायिक लोक हे हॉस्पिटल घेण्यासाठी व्यवस्थापनाकडे गेले. कामगारांकडे गेले पण त्यांचा हेतू ठीक न्हवता हे व्यवस्थापनातील काही चांगले लोक आणि कामगार यांच्या लक्षात आला आणि त्या व्यवसायिकांबरोबरचा व्यवहार रद्द झाला.गेली तीन वर्षे कामगारांना काहीही वेतन मिळाले नाही. त्यांच्या जीवन मारणाचा प्रश्न निर्माण झाला. काही कामगार आश्या स्थितीमुळे मरण ही पावले. पण हॉस्पिटल बद्दलची आस्था त्यांच्या मनातील काही कमी नाही झाली.आणि रात्रं न दिवस ते हॉस्पिटल ची राखनदारी करत राहिले.
एक दिवस माझ्या कडे काही कामानिमित्त माझे मित्र मा. संदीप घोलप (पास्टर ) मुंबईला आले होते. त्यांनी या हॉस्पिटल संदर्भात मला माहिती सांगितली कामगारांचे खुप हाल होत आहेत. काही मार्ग काढता येईल का असे विचारले. पंचवीस कोटी रुपये कामगारांचे पगार थकीत आहेत आश्या वेळी कोणी काहीच करू शकणार नाही तरीपण मी सांगितले आपण हॉस्पिटलला भेट देऊ आणि पहिले कामगारांना भेटून त्यांचे काय मत आहे हे पाहू. आम्ही त्याच आठवड्यामध्ये हॉस्पिटलला भेट दिली. आणि कामगारांची बाजू ऐकून घेतली. त्यामध्ये कामगारांचे नेते मा. सतीश वायदंडे, मा. राजू लोंढे आणि मा.शशिकांत कांबळे ( हॉस्पिटल पाळक ) यांची भेट झाली. माझ्या सोबत माझा भाऊ मा. नानासाहेब वाघमारे आणि काही कार्यकर्ते ही होते.कामगारांचे हॉस्पिटल आणि सर विल्यम वॉनलेस यांच्यावर असलेले प्रेम जबरदस्त पाहायला मिळाले. कामगारांनी सांगितले आम्ही उपाशी मेलो तरी चालेल पण ही ऐतिहासिक वास्तू आम्ही कोणाला विकणार नाही.
आमच्या तीन पिढ्याना या हस्पीटलने सांभाळले आहे.अनेक लोक विदेशात गेले चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या हे केवळ या हॉस्पिटल मुळे झाले. हे सांगताना अनेकांच्या डोळ्यात आश्रू होते. एका बाजूला बेकारी नोकरी नाही पैसा नाही. तरीही एवढ्या उच्च प्रतीची आस्था या हॉस्पिटल बद्दल पाहायला मिळाली. जर कामगारांनी ठरवले असते तर हॉस्पिटलमधील सर्व मशीन आणि इतर सामान विकून काही प्रमाणात पैसे घेतले असते हॉस्पिटल कामगारांच्याच ताब्यात होते. त्यांना काही अवघड न्हवते पण त्यांनी तसें केले नाही. इथेच मला जाणीव झाली कि हे लोक एवढे सहन करतायत निःस्वार्थी भावानेने कधी पैसे कोणी देईल अशी आशा ही ठेवली न्हवती पण हे हॉस्पिटल वाचवायचेच ही त्यांची भावना माझ्या मनाला शिवून गेली.आणि मी त्याच दिवशी परत मुंबईला आलो. मनात विचार घोळत होता काय करता येईल आपल्याला कामगारांचे देणे त्याचबरोबर वीज बिल, पाणी बिल घरपट्टी असे एकूण बेच्याळीस (42) कोटी रुपयांची देणी थकीत बाकी आहेत. आणि एवढे पैसे लावून हॉस्पिटल उद्या नाही चालले तर. समोर अंधार आहे. विचार करून करून माझे मन नकारार्थी झाले. त्यानंतर काही लोकांनी मला फोन करून सांगितले ही साहेब तुम्ही इथे येऊ नका हे कामगार खुप खराब आहेत. ते तुमचे नुकसान करतील इथे फसू नका मी खरंच मनातून विषय काढून टाकला. पण मा. संदीप घोलप (पास्टर ) मा. शशिकांत कांबळे (पाळक ), मा. सुरज बाबर,मा.नितीन अहिवळे यांनी सातत्याने मला भेटून फोन करून माझ्या मनाची तयारी करू लागले. यांच्या लक्षात आले. विनोद निकाळजे साहेब आता काही तयार होत नाहीत. तर यांनी कामगार नेते मा. सतीश वायदंडे, मा. राजू लोंढे यांनाही घेऊन माझ्याकडे मुंबईला सातत्याने येऊ लागले त्यानंतर माझा भाऊ मा. नानासाहेब वाघमारे यांना ही घेऊन माझी मानसिक तयारी करण्यासाठी मुंबईला भेटू लागले हा प्रवास आठ महिन्यांचा आहे.
माझा भाऊ नानाने मला सांगितले कामगारांचे असे मत आहे हे हॉस्पिटल दिले तर तुम्हालाच आम्ही देणार बाकी कोणालाच इथे येऊ देणार नाही. कारण आम्हाला खात्री वाटते नाना तुम्ही आणि निकाळजे साहेब या हॉस्पिटलला पुन्हा पूर्वीचे दिवस आणू शकता. मी माझ्या पत्नीशी ही या संदर्भात चर्च्या केली तिनेही सांगितले रिस्क तर फार मोठी आहे. पण कामगार जर तुमच्या सोबत असतील आणि प्रामाणिक पणे तुम्हाला साथ देत असतील तर रिस्क घ्यायला हरकत नाही. कामगारांना विश्वासात घेऊन आणि मिरज मेडिकल सेन्टर च्या डायरेक्टर डॉ. प्रभा क्युरेशी यांना विश्वासात घेऊनच पुढे वाटचाल करता येईल. एक वेळ तर कामगार नेते सतीश आणि राजू अक्षरशः माझ्या समोर रडले आणि म्हणाले साहेब तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुम्हाला कसलेच टेन्शन देणार नाही.
सुरुवातील सर्व कामगारांचा एक एक पगार द्या आणि कामाला सुरुवात करा. पण मला माहित होते एवढ्यावर हे भागणारे न्हवते कारण इलेक्ट्रिक बिल भरले नसल्यामुळे ते ही भरायचे होते पाणी बिल मशीन ची डागडुजी अनेक कामे आहेत या साठी खुप पैसा लागणार होता. आणि मला एकट्याने ते पेलवणारे न्हवते. मग मी माझे मित्र मा. हितेश शिंदे आणि मा.राकेश गोसावी यांच्याशी चर्च्या केली त्यांचा माझ्यावर प्रगाढ विश्वास आहे. ते मला म्हणाले विनोदजी हा खुप मोठा विषय आहे आणि या मध्ये कधी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून आणि कामगारांकडून काही धोका झाला तर आपण मात्र रस्त्यावर येऊ एवढी मोठी रिस्क कशी काय घेणार. मग मी ठरवले मिरज मेडिकल सेंटर वॉनलेस हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉ. प्रभा कुरेशी यांच्याशी संवाद करू त्यांच्याकडून आपल्याला काय माहिती मिळते बघू पण जेंव्हा आम्ही डॉ. प्रभा कुरेशीना भेटलो तेंव्हा त्यांनी सरळ सांगितले सर हे हॉस्पिटल पुन्हा सुरु झाले पाहिजे.आणि कामगार जर तुम्हाला साथ देत असतील तर आम्ही ही तुमच्या सोबत आहोत.
आमचे मित्र मा. राकेश गोसावी प्रचंड हुशार व्यक्तिमत्व कोणतेही काम त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याची पूर्ण पार्श्व भूमी समजून घेऊन ते काम यशस्वी करायचे हा त्यांचा हातखंडा आहे. आणि केवळ मा.राकेश भाऊ च्या टेक्निकल कामामुळेच आम्ही अग्रीमेंट पर्यंत पोहोचलो.मा. हितेश शिंदे यांचा माझ्यावरील विश्वास आणि माझा भाऊ नाना वाघमारे याची साथ माझी पत्नी आयुष्यमती अरुणा निकाळजे हिचा पाठिंबा मा. संदीप घोलप(पास्टर), मा. शशिकांत कांबळे (पाळक) मा. सतीश वायदंडे (कामगार नेते ), मा. राजू लोंढे (कामगार नेते ) मा. सुरज बाबर, मा. नितीन अहिवळे आणि सर्व कामगार यांचे मनापासून आम्हाला सहकार्य आणि मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांचा आशीर्वाद मा.ना. आठवले साहेबांना जेंव्हा मी सांगितले हॉस्पिटल संदर्भात तर साहेबांना खुप आनंद झाला आणि मला म्हणाले हॉस्पिटल साठी तुला काय मदत लागेल ती मी करतो आणि मेडिकल कॉलेज ही सुरु कर त्यासाठी लागणारि जी काही मदत आहे ती मी करतो.
साहेबांच्या आशीर्वादामुळे आणखी प्रचंड बळ आले.त्यानंतर आम्ही कामाला लागलो.मी सांगली जिल्ह्यातील अनेक डॉक्टर, अनेक समाजसेवक, अनेक राजकीय नेते, आमदार, खासदार, उद्योगपती, साखरकारखान्याचे चेरमन यांना व्यक्तिशः भेटून किंवा फोन वरून हॉस्पिटल संदर्भात बोललो तर प्रत्येकाने सांगितले हे खुप महत्वाचे आणि ऐतिहासिक हॉस्पिटल आहे. आपण हे पुन्हा सुरु करत आहात तर आमचा पूर्ण पाठिंबा आहे. कारण या हॉस्पिटलने गेल्या 130 वर्ष्यात हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. हजारो लोकांचा तुम्हाला आशीर्वाद लागणार आहे.पुन्हा एकदा या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही साक्षीदार होऊ आणि म्हणून आम्ही तुमच्या उदघाट्नच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे.आणि आमचा तुम्हाला मनापासून पाठिंबा आहे.आणि 25 मे ला पुन्हा हे हॉस्पिटल मोठ्या दिमाखात गोरगरीबांना आरोग्य सेवा देण्या साठी सुरु होत आहे.
