सकल मातंग समाजाचे आझाद मैदानावरील जन आक्रोश महाआंदोलन यशस्वी, उपवर्गीकरण होणारच.- संदीप(तात्या) ठोंबरे

Spread the love

सकल मातंग समाजाचे आझाद मैदानावरील जन आक्रोश महाआंदोलन यशस्वी, उपवर्गीकरण होणारच.- संदीप तात्या ठोंबरे

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-

राज्यातील मातंग समाज हा फार हुशार आहे समाजाच्या प्रश्नावर एका झेंड्याखाली एकत्र येऊ शकतो आणि आपल्या न्याय मागण्यासाठी तो लढा उभा करू शकतो आणि यशस्वीही करू शकतो हे सकल मातंग समाजाच्या जन आक्रोश महाआंदोलनाच्या निमित्ताने मुंबईच्या आझाद मैदानावर समाजाने दाखवून दिले आहे तर मातंग समाजाच्या नावावर बाजींदपणा करणाऱ्या नेत्यांना समाजाने झिडकारले आहे असे मत फकिरा पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांनी व्यक्त केले.

सकल मातंग समाजाच्या वतीने 20 मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित केलेल्या जन आक्रोश महाआंदोलनाला राज्यातील मातंग समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मातंग समाजाचे वादळ जणू काय मुंबईवर आलं होतं महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आंदोलन स्थळी पाठवून दिले होते मातंग समाजानेही त्यांचा आदर आणि मान सन्मान केला त्यांना क्रांतिसूर्य लहुजी वस्ताद साळवे यांचा पेहराव असलेला फेटा घोंगडं आणि काठी देऊन अस्सल लहुजींच्या वेशातला सत्कार करून त्यांचा सन्मान केला आंदोलनाच्या मागण्याच्या निमित्ताने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयाचा आदर करत अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उप वर्गीकरण निश्चित लागू करेल असे म्हणतानाच येत्या पंधरा दिवसात मातंग समाजाच्या म्होरक्यांची बैठक माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे बरोबर घेणार असल्याचे सांगून राज्यातील आरक्षण उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकूणच मातंग समाजाच्या एकूण सात मागण्यांच्यासाठी झालेल्या जन आक्रोश महाआंदोलनाला राज्यातील समाज बांधवांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद देऊन उपस्थिती दाखवली आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी म्हटल्याप्रमाणे आता कोणी वळू नका कोणी चळू नका बिनी मारायची अजून राहिली ती बिनी मारण्यासाठी मातंग समाज मुंबईच्या आझाद मैदानावर ताकतीनिशी उतरल्याचे पाहून समाधान वाटले आणि एक गोष्ट समाजाला ही समजली समाजाच्या नावावर शंकू गिरी आणि बाजींदपणा करणाऱ्यांना या निमित्ताने मातंग समाजाने हातकारले आहे.

मातंग समाजाच्या न्याय हक्काचा लढा अजून संपलेला नाही हे जरी खरे असले तरीसुद्धा मातंग समाजाला न्याय मिळवणे आता फार अवघड नाही ही गोष्ट फार महत्त्वाची आहे या आंदोलनाच्या निमित्ताने समाजातील साहित्यिक, लेखक, समीक्षक प्राध्यापक यांनी आपापल्या पद्धतीने समाज एकवटण्यासाठी आव्हाने केली काय जणांनी खरं लिहिलं काय जणांनी बर लिहिले तर काहीजणांनी नको ते लिहिलं हेही या निमित्ताने समाजाने पाहिला आहे..!मातंग समाजाच्या न्याय हक्काचा मागण्यांच्यासाठी सकल मातंग समाजाच्या एकजुटीच्या एकसंघतेच्या माध्यमातून झालेल्या ऐतिहासिक आंदोलनस्थळी आमदार खासदार माजी मंत्री सर्व पक्ष संघटना यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकाच झेंड्याखाली आणल्या मुळं आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा निश्चित जिंकू असा विश्वास मला वाटतो…!

—————————————-

मा.संदिप तात्या ठोंबरे फकिरा पॅंथर सेना संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *