
आरक्षण उपवर्गीकरण महाआंदोलनासाठी हजारो कार्यकर्ते मुंबईला जाणार… संदीप तात्या ठोंबरे
—————————————-
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
१ ऑगस्ट रोजी अनुसूचित जातीच्या आरक्षण उप वर्गीकरणासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्रातील सकल मातंग समाजाच्या पुढाकाराने मुंबई आझाद मैदान येथे २० मे रोजी होणाऱ्या जन आक्रोश महाआंदोलनासाठी पश्चिम महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने अनुसूचित जातींच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मुलांबाळासोबत मुंबईला उपस्थित राहावे असे आवाहन सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक तथा फकीरा पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण संदीप तात्या ठोंबरे यांनी केले.
विटा येथे पश्चिम महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वधू वर सूचक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते प्रा. वसंतराव यादव नंदकुमार सोनावले डॉ.श्रीधर भिंगारदेवे डॉ.विद्यादेवी सचिन ठोंबरे दलित मित्र पुरस्कार प्राप्त रामचंद्र भिंगारदेवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.ते बोलताना म्हणाले की तेलंगणा आंध्रप्रदेश या राज्यांनी अनुसूचित जातीचे आरक्षणाचे उप वर्गीकरण करावे याला मान्यता दिली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीचेआरक्षणाची उपवर्गीकरण तात्काळ करावे या मागणीसाठी जन आक्रोश महाआंदोलन २० मे रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणार आहे.
महाराष्ट्रातील मातंग समाजासहित अनुसूचित जातीच्या अनेक पक्ष संघटना यांनी या आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला आहे त्यामुळे सदरचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन रेल्वे बस व मिळेल त्या वाहनाने घरातील भाकरी बांधून आंदोलन यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे.
अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरण लढ्याचे हे ऐतिहासिक आंदोलन असून आता नाही तर कधीच नाही या उक्तीने राज्यातील मातंग समाज एकवटला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या म्हणण्याप्रमाणे आता कुणी वळू नका कोणी चळू नका आता बिनी मारायसाठी लाखोच्या संख्येने मुंबईला उपस्थित राहावे.यासाठी फकीरा पँथर सेनेच्या वतीने सुक्ष्म नियोजन केले आहे.
आरक्षण उप वर्गीकरण लढ्यासाठी या आंदोलनासाठी पुढाकार घेऊन फकीरा पॅंथर सेनेचे कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे त्यांनी सांगितले सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव मुंबईला जाणार असल्याची माहिती यावेळी फकिरा पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक संदीप तात्या ठोंबरे यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमास भगवान लोंढे दलित मित्र रामचंद्र भिंगारदेवे ,ज्येष्ठ नेते शेखर तात्या भिंगारदिवे, इंजिनियर दुष्यंत कांबळे, डॉ.प्रथमेश भिंगारदिवे डॉ.सचिन ठोंबरे प्रा. महादेव कांबळे प्रा.भगवान लोंढे फकिरा पॅंथर सेनेचे राज्य समन्वयक सुभाष लांडगे राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल सकट कडेगांव तालुक्याचे नेते संदीप देवकुळे वाळवा तालुका अध्यक्ष महेश घस्ते वसंतराव तुपे यांचे सह महिला कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
