
पाटीलकीची पंचाहत्तरी!
जागृतीचा ‘विस्तव’ कधीही
विजता कामा नये!
क्रांतिसिंह नाना पाटील.
लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.
लेखक व्यवसायाने पत्रकार असून,
महाराष्ट्र राज्य स्तरावरती वरिष्ठ बातमीदार म्हणून,मंत्रालयीन स्तरावरती काम पाहत आहेत.त्यांच्या अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया,
www.vruttvegnews.com.
या अधिकृत वेब पेजला सर्च करा.
mobile number 8080532937.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र हा हिरवागार साखरेचा पट्टा म्हणून ओळखला जातो. सबकुछ “पाटीलकी” असं इथलं समीकरण मानलं जातं.गावातली दूध डेरी,विकास सोसायटी, तालुक्याचा खरेदी विक्री संघ,जिल्हा मध्यवर्ती बँका,पतपेढी पतसंस्था क्रेडिट सोसायटी,यावरती केवळ आणि केवळ फक्त “पाटीलकीचं” प्रभुत्व आहे. मात्र या “पाटीलकिने” गावागावात काय दिले,हा संशोधनाचा भाग आहे. कार्यकर्त्याने पाटलाच्या वाड्यावरचा,उंबरा झिजवणे या व्यतिरिक्त,फारशी प्रगती झालेली दिसून येत नाही.अन्यथा डबल आडनावाची
‘पाटीलकितील डबलबारी’ लाखोंच्या संख्येने रस्त्यावर मोर्चाच्या रूपाने
उतरले नसते.
दहा पाटलांच्या पुण्याई वरती
९० पाटील बिनधास्तपणे
“चरत” असल्याची साक्ष देणारी
वर्तमान काळातील ही राजकीय परिस्थिती येणाऱ्या भविष्य काळामध्ये,
पाटीलकीला घातकी ठरणारी आहे.
गावाकडे वाडा वडलाची एक म्हण आहे.
१० पाटलांच्या “पुण्याईवरती” ९० पाटलांची”पाटीलकी” अजून तागायत टिकून आहे.ही १० पाटलांची पुण्याई आज विविध-गरीब पाटलांच्या मुळावरती उठलेली आहे.तर श्रीमंत ९० पाटील त्यावरती “मजा’ मारत आहेत.
मराठा समाजातील,प्रतिष्ठेचे लक्षण समजल्या जाणाऱ्या “पाटील”
आडनावा भोवती,दहा टक्के पुण्याई,
मिळवून ठेवलेल्या पाटलांच्या पुण्याई वरती ऐषाराम करणाऱ्या ऐतखाऊ ९० टक्के पाटलांच्या,सरंजामशाहीकडे सुरु असणाऱ्या वाटचालीस,वेळीच ब्रेक लागला नाही तर,कदाचित धास्तावलेली पाटीलकितील अस्वस्थ मने,येणार्या भविष्यकाळात विद्रोहाची वाटचाल पुकारले शिवाय स्वस्त राहणार नाहीत.
नागपूरच्या राजे भोसले छत्रपती घराणे,तंजावर,सातारच्या भोसले घराण्यांच्या छत्रपती गादी पर्यंत मराठ्यांचा इतिहास हा सुवर्णाक्षरांनी इतिहासामध्ये दिलेला आढळतो.याला आणखीन एक अपवाद दिसून येतो ती, कोल्हापूरची छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची कोल्हापूर संस्थांणची गादी.या साऱ्या इतिहासामध्ये वतनदार कुलकर्णी,देशपांडे,गावची “पाटीलकी”सांभाळणारे,काही आलूते बलुते दार,यांना इतिहास काळामध्ये दिले गेलेले पदवी “पाटीलकी” या नावाने पुढे प्रसिद्धीस आली.ती आता सरकारी भाषेत “पोलीस पाटील” या नावाने रूढ झालेली आहे.मात्र “पाटील” या शब्दाची क्रेझ हल्ली इतकी वाढलेली आहे की,याचं पाटीलकी च्या जोरावरती नव्याने “सरंजामशाही” सुरू होती की काय?
अशी भीती आता नव्याने वाटू लागली आहे.
फार पूर्वी गाव कुसा वरती गावगाडा सांभाळणारा तो गावाचा प्रमुख पाटील डोक्याला लहरी फेटा,अंगावरती काळा कोट,अंगाखाली पांढऱ्या रंगाचे धोतर ओठावरील पिळदार मिशा,पायात कराकरा वाजणारे कोल्हापुरी पायतान हातात लांब यत्ता ची काठी,धारदार नजरेचा कटाक्ष,आवाजातील भारदस्तपणा,वाड्यावर च्या घराच्या आतील सागवानी लाकडाच्या झोपाळ्या वरती बसून “फळी वरच्या कोर्टा” सारखा [ कोल्हापुरातील फुलेवाडी येथील पापा बोंद्रे यांची न्यायनिवाडा करण्याची पद्धत तत्कालीन काळातील फळी वरच्या कोर्टा सारखीच होती .सध्या ते दिवंगत आहेत.]
साऱ्या गावाचा न्याय-निवाडा करणारा तो पाटील नीतीमतेने नैतिकतेणे,वाडा वडिलांच्या म्हणीनुसार दहा पाटलांच्या पुण्याईवर ती टिकून राहिलेल्या पैकी एक “पाटील” होता.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीहत्या झाली होती.या गांधी हत्येनंतर,दोन प्रकारचे स्वातंत्र्य पाटीलकिला
बामन मुक्ती तून मिळाल्याचे बहुजन पुढाऱ्यांनी ढोल बडवून सांगितले.साऱ्या देशभर अस्तावस्तपसरलेल्या सर्व जमनी शेतमळे यावरती,ब्राह्मण वगळता समस्त सवर्ण हिंदूंना कब्जा करत आला.आणि दुसरे स्वातंत्र्य असे की गाव गाड्या पासून ते,तालुका जिल्हा स्तरापर्यंत सहकाराची नव्याने मांडणी केली गेली.सहकारी कायदा १९६० अंतर्गत,गावागावात शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाची नांदी ठरणारे या सहकारी विकास सेवा सोसायटी, सहकारी पतसंस्था,सहकारी बँका,सहकारी वित्तीय संस्था,सहकारी साखर कारखानदारी,सहकारी तत्त्वावर च्या शेतीमाल प्रक्रिया संस्था,इत्यादींशी अगदी जोरकसपणे गावोगावी स्थापना करण्याचा सपाटा चालू झाला.राजे शाही, वतनदारी नष्ट झाल्याने,गावोगावी सहकारातून शेतकर्यांचा मोट बांधण्याचा जोरदार यशस्वी प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी झाला.सुरुवातीच्या काही वर्षे यामध्ये राजकारणाचा काही अंशी घुसला नव्हता.मात्र, हळूहळू याचा जोरकस शिरकाव होऊ लागल्याने,गावोगावी तालुका ठिकाणी जिल्हा ठिकाणी राज्यस्तरावरती पाटीलकिची विभागणी झाली.
दहा पाटलांच्या पुण्याई वरती ‘चरणारे’
ते ९० श्रीमंत पाटील आपल्या वाडवडिलांच्या पुण्याई चे पोवाडे तिच्या रूपाने गाउ लागले.सहकारात साखर कारखानदारीत राजकारणात ते फक्त “चरत” गेलेत,गावोगावी तालुका ठिकाणी जिल्हास्तरावर ती राजकारणाच्या गटातटाचे रक्तरंजित राजकारण पेटवून,स्वतःचे राजकारणातील अस्तित्व पिढ्यानपिढ्या साठी,टिकवून ठेवले सांभाळले वाढीस लावली.
कृष्णा-कोयनेच्या नदी तीरावरील संगमा वरती,गावगाड्यावर राजकारणातून कराड तालुक्यातील तांबवे गावच्या अण्णा बाळा चा पाय तोडल्याची रक्तरंजित आर्त हाक,कोल्हापूरहून पन्हाळ्याला जाताना वाघबीळ नजीक असणाऱ्या घाटाच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या,रक्तरंजित राजकारणातून भाऊबंदकी ओस पडलेला तो “नलवडे” सरकारांचा रिकामा वाडा,याच पन्हाळा तालुक्याच्याआसुर्ले-पोरले गावाच्या हद्दीतील रिकाम्या माळरानावरील संस्थापक अध्यक्ष गणपतराव सरनोबत यांनी लावलेल्या दत्त असुरले सहकारी साखर कारखाना आणि याच साखर कारखानदारीचे वृक्ष,
या झाडाची फळे चाकून खात खाता खाता,भारतातील आघाडी चा उद्योगसमूह असणारा,दालमिया ग्रुपच्या घशात घालणारे तत्कालीन दत्त असुरले साखर कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब पाटील,विद्यमान संचालक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,आणि यांच्या मुळे साखर कारखानदारीत देशोधडीला लागलेला कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी ऊस उत्पादक या कारखानदारीची चिमणी,सहकारातील ऊस उत्पादकांच्या साठी कायमची विझलेली आहे.
सहकारी तत्त्वावरील साखर कारखानदारीची अशी ५४ चिमणी तब्बल पश्चिम महाराष्ट्रातून खाजगीकरणाच्या घशात गेलेली आहेत.आणि इथल्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदाला देशोधडीला लावण्याचे काम याच दहा पाटलाच्या पुण्याई वरती नौटंकी करणाऱ्या नव्वद पाटलांनी केलेले आहे.बदलत्या सहकाराच्या काळाच्या ओघात कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहरासह अनेक सहकारी तत्त्वावर च्या बँका या,अन्य बाहेरील बँकांमध्ये “मर्जे” करण्याचा मोठा पराक्रम याच पाटील कित केलेला आहे.
केवळ दीड लाखाची सरतेशेवटी शिल्लक रक्कम असलेल्या एस के पाटील को-ऑपरेटिव सहकारी बँकेवरती जेव्हा प्रशासकाला लेखापरीक्षणाचे माध्यमातून असल्याचे जाणीव झाले.
त्यावेळेस सहकारातील व साखर कारखानदारीतील,वस्त्रोद्योगातील,
राजकारणातील सत्ता साम्राज्य टिकवण्यासाठी-सांभाळण्यासाठी,
तत्कालीन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळातील वाटलेल्या कर्जाची खिरापत किती असावी याचा अंदाज फक्त कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक लागू झाल्यानंतरच आला होता.
आपली जिव्हाळ्याची बँक या ब्रीद वाक्य वरती,कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळातील पाटीलकीने नेमकी पैशाची वारेमाप बेकायदेशीर खिरापत कोणासाठी केली,हा संशोधनाचा भाग आहे.तत्कालीन प्रशासकीय काळात संचालक मंडळावर ती फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल झालेला आहे.
तिलारी घाटाचा चंदगड गोव्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्गाचा
ओळख असणारा चंदगड तालुका,
राजकारणात “बारा पाटलांच्या” एकजुटीचे हत्तीचे बळ घेऊन जेव्हा येतो,अशावेळी राजकारणातील सत्तेच्या अतिमहत्त्वाकांक्षी पाई उध्वस्त झालेला सहकार समूह व गोत्यात गेलेली साखर कारखानदारी,ऊस बिलाचा संघर्षासाठी देशोधडीला लागलेला इथला शेतकरी सभासद,स्वातंत्र्यानंतरच्या ७५ व्या वर्षी देखील अस्वस्थ आहे,उदासीन आहे.
या दहा पाटलांच्या पुण्याई वरती अनेकांनी केलेली मिळकत पाहता,९० गरीब पाटलांची अनेक मुले,शिक्षणा विना खोळंबून बसलेली आहेत.तर अनेक जण शिक्षणाच्या पदव्या घरात खुंटीला टांगून निराश हाती नोकरी अभावी बसलेले आहेत.
नोकरीच्या अभावी अनेकांची लग्न वयाच्या चाळीसाव्या वर्षी देखील,आज घडीला होताना दिसून येत नाहीत.शिक्षणासाठी काढलेल्या,शेतीच्या पिकासाठी,शेती उत्पादित मालाला बाजारपेठ स्थिर हमीभाव मिळत नसल्याने,आजारपण लग्नपाणी व अन्य घरगुती कारणापायी काढलेले खाजगी सावकाराचे कर्जाचा डोंबाळा फिटता फिटत नसल्याने,अनेक गरीब पाटलांनी त्यांच्या शेताच्या बांधावर ती फास लावून घेतल्याचे आजघडीस दिसून येते.
गावातील सहकारी संस्था,सहकारी दूध संस्था,सहकारी पतसंस्था,सहकारी शेतीमाल प्रक्रिया उत्पादक संस्था,तालुकास्तरावरील तालुका खरेदी विक्री संघ,तालुका स्तरावरील साखर कारखानदारी,जिल्हा स्तरावरील सहकारी बँक,इत्यादी वरती आज घडीस याच पाटीलकीचे वजन नेतृत्व आहे.
अशा अनेक श्रीमंत पाटलांच्या श्रीमंतीची मोजमाप केले तर,हजारो एकर घेऊन ठेवलेल्या जमिनी,बेनामी प्रॉपर्टी,दडवून ठेवलेले विविध दस्तऐवज,राजेशाही थाटातील दैनंदिनी लाखो रुपये खर्चाचे जगणे,सरकार कडून ढापल्या गेलेल्या हजारो एकराचे वर्ती कवडीमोल दराने जमिनी,अभिमत विद्यापीठांच्या माध्यमातून केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून लावला गेलेला वर्षाकाठी शेकडो कोटींचा चुना,कोणत्या सोजवळ पाटीलकिचे त्रोटक उदाहरण ठरणारे आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीच्या पैलतीरा पासून,ते कुंभी कासारीचे नदी तीरावरील संथपणे वाहणारे पाणी,सरतेशेवटी ज्या वारणा नदीच्या पैलतीरावरती मिसळून जाते.
या नदी किनारी वसलेल्या गेलेल्या,
कोल्हापूर सांगली पश्चिम महाराष्ट्रातील अग्रणी असणाऱ्या”सहकारी” व “साखर कारखानदारी” क्षेत्रातील किनारपट्टीचा
आर्थिक बुरुज याच पाटीलकीने ढासळलेला आहे.
हा बुरुज इतका आर्थिकदृष्ट्या कर्जात गेलेला आहे की,याची सारी घाण प्रदूषणाचे रूपाने राज्यस्तरावरील मंत्रालय स्तरावर ती पोहोचलेली आहे.
बारा बलुतेदारी पैकी,आलूतेदार बलुतेदारी आपापल्या छोट्या-मोठ्या धंद्यामध्ये मग्न आहेत.काही ठिकाणी चढ-उतार आलेली आहेत.मात्र बलुतेदारांच्या,कष्टाळू वृत्ती पुढे व्यवसाय टिकून राहिलेले आहेत.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर अडचणीत सापडलेली-आहे ती फक्त ‘पाटीलकि’ आणि तिच्यातील “गरीब पाटीलकी”बेकारी कर्जाचे छायेत, सावकाराच्या पाशात,न फीटणार्या सहकारातील वर्षाच्या पीक कर्जात, शेती उत्पादित मालाला न मिळणारा स्थिर हमी भाव यांच्या कचाट्यात ही पाटीलकी सापडली आहे.ती केवळ जिवंत आहे त्या दहा पाटलांच्या पुण्याई वरती,मात्र याच १० पाटलांचे पुण्याईवरती ९० श्रीमंत पाटील मजा मारत आहेत.त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या दहा पाटलांच्या पुण्याईच्या वाडा वडिलांचे गोडवे दरवर्षी जयंतीच्या रूपाने गाता गाता!
[दहा पाटलांच्या पुण्याई वरती नव्वद पाटलांनी बाविसाव्या शतकांमध्ये करून ठेवलेली प्रगती]
सहकारी साखर कारखानदारी येथील ५४ साखर कारखाना दारीची केलेली संशयास्पद खरेदी-विक्री ही,
सध्या विशेष सक्तवसुली संचालनालय डायरेक्टर मेंटचा रडार वरती आहेत.
भोगावती साखर,कुंभी साखर,वारणा साखर,वसंतदादा साखर,पंचगंगा साखर दौलत साखर,महाकाली,
सातारा नगर सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर,परभणी येथील एकेकाळी नावाजलेले साखर कारखानदारीतील कारखानेसद्यस्थितीत अतिशय बिकट अवस्थेत आहेत.
महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती सहकारी बँक[एम एस सी बँकमुंबई],कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासकीय चौकशीतून गेलेली आहेत.
तर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,
रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या चौकशी च्या दारात घेऊन ठेवलेली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेचे पासून ते,मराठा बँक, बलभीम बँक,
यासह अन्य पस्तीस सहकारी तत्वावरील सहकारी बँका-सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कराड शहरातील ५०० कोटी च्या वरती बेकादेशीर कर्जवाटप झाल्याचा ठपका ठेवलेल्या एका जनता सहकारी बँकेचे सह पश्चिम महाराष्ट्रातून आर्थिक गुंतवणूक झालेले अनेक शेतकरी बांधव कोट्यावधी रुपयेला देशोधडीला लागलेली आहेत.
[दहा पाटलांची पुण्याईवरती टिकून राहिलेल्या त्या गरीब पाटलांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी,गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यावरती उतरलेले लाखोंचे मोर्चे,मिळत नसलेल्या रोजगारावरती
,नोकरीमध्ये मिळायला हवी असणाऱ्या आरक्षणाबाबत,व्यवसाय करता मिळणाऱ्या आर्थिक सहाय्य याबाबत,शालेय शैक्षणिक प्रक्रियेमध्ये,हक्काने प्राधान्यक्रमाने मिळायला पाहिजे असलेल्या आरक्षणाचे संदर्भात,शेती उत्पादित मालाला स्थिर हमी भाव मिळण्याचे साठी,ऊस उत्पादनाला जास्तीत जास्त हमीभाव मिळवण्यासाठी,पदवी पूर्ण झालेल्या सुशिक्षित बेकार तरुण युवकांचे साठी,झटत आहेत झगडत आहेत संघर्ष करीत आहेत.
मात्र,याच १० पाटलांच्या पुण्याईवरती वाडा वडिलांचे गोडवे गाऊन,
९० श्रीमंत पाटील त्यावरती मजा मारत आहेत.]
