
रिपाई आठवले गटाच्या वतीने,
कोल्हापुरात १७ मे रोजी होणाऱ्या मातंग परिषदेस इचलकरंजी परिसरातून शेकडो रिपाई कार्यकर्ते उपस्थित राहणार.
- रिपाई जिल्हा नेते
सतीश माळगे यांची माहिती.
केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांची प्रमुख उपस्थिती.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-
इचलकरंजी प्रतिनिधी
दिनांक-१४ मे २०२५
रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेब हे १७ मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या उपस्थिती मध्ये तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक दसराचौक कोल्हापूर येथे सायंकाळी ५ वाजता मातंग परिषदेचे आयोजन केले आहे या परिषदेच्या पुर्व नियोजनासाठी १२/०५/२०२५ रोजी इचलकरंजी येथे रिपाई नेते कोल्हापूर जिल्हा सतिश माळगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
यावेळी बोलताना सतिश माळगे
यांनी ना.रामदासजी आठवले साहेब हे बहुजनांचे ह्रदय सम्राट आहेत डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर तळागळातील समाजाला न्याय देण्याचे काम एकमेव नेते रामदासजी आठवले साहेब हे करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्यास रिपब्लिकन पक्ष सदैव मातंग समाजाच्या मागे ठामपणे उभा आहे हे सांगण्यासाठी कोल्हापूर शाहूनगरीमधून मातंग
परिषदेचे आयोजन रिपब्लिकन पक्षाचे वतीने करण्यात आले आहे.
या मातंग परिषदेस इचलकरंजी तसेच परिसरातून शेकडो मातंग समाज बांधव उपस्थित राहणार असा आशावाद रिपाई नेते आयुष्यमान सतीश माळगे यांनी व्यक्त केला.
यावेळी जेष्ठ नेते किरण नामे,होलार समाजाचे जेष्ठ नेते राजू भडंगे,
कुंडलीक कांबळे होलार आघाडी चे लक्षण पारसे(आण्णा),मातंग आघाडीचे बादल हेगडे,भारत पाथरचट,निखील मोरे,भीमा साठे,राहूल साठे,तानाजी चव्हाण,साहेब साठे,नारायन आगवणे,रोहित साठे,राहूल साठे
आकाश बेगडे,अवधूत हात्तीकर,अनमोल घाटगे,गौरव आदमाने,राहुल संजय घाटगे,राजेश तनपुरे,सागर भोसले,गणेश भोसले,अजित समदे,सुर्यकांत चौगुले यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
