
मिरजेत दोन हजार लोकांच्या उपस्थितीत सारनाथ बुद्ध विहाराचीधम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न.
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे.
दिनांक १२ मे २०२५ बुद्ध पौर्णिमाचे औचित्य साधुन मिरज येथील माजी सैनिक वसाहत येथील सारनाथ बुद्ध विहाराच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त धम्म परिषद २०२५ घेण्यात आली.जिल्ह्यातून सर्व भागातून धम्म बंधू तसेच सर्व जाती धर्माचे बंधू उपस्थित होते. प्राचार्य बापूसाहेब माने सर, प्रा. गौतमीपुत्र कांबळे सर, प्रमुख वक्ते उत्तम कांबळे सर या तिघांनी वैचारिक प्रबोधन करून आजच्या समाजाचे वास्तव,बौद्ध तत्वज्ञान व आपण भारत बौद्धमय चे उपाय याच्या वरती विस्तृत असे प्रबोधन भाषण पार पडले.
पहिल्या सत्राचे प्रास्ताविक विहाराचे उपाध्यक्ष रामदास कांबळे यांनी केले .पहिल्या सत्रात भदंत रतन बोधी ,भदंत सिरासारो यांची धम्म देशना देण्यात आली. दुसऱ्या सत्राचे प्रास्ताविक डीपी बनसोडे यांनी केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश होवाळे यांनी विहाराचे कार्य व धम्म परिषद कशासाठी घ्यावयची हे विषद केले.





कार्यक्रमाचे आभार कार्यकारणी सदस्य अशोक होवाळे यांनी केले.सारनाथ बुद्ध विहाराच्या सर्व कार्यकारिणी व पदाधिकारी तसेच सर्वच सभासदांनी महिला ग्रुपने सर्वांनीच मोठ्या प्रयत्नाने मोठ्या उत्साहाने परिषद पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाश होवाळे यांनी लिहिलेल्या “बुद्धांची देशना “या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. जितेंद्र कोलप यांनी केले.
