
दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क :-
मुळ प्रस्तावना.एकूण भाग सात.
लेखक श्री तानाजी सखाराम कांबळे. 8080532937.
लेखक हे राज्यस्तरावरील वरिष्ठ पत्रकार असून.ते राजकीय विश्लेषक आहेत.
————————————————-
एक काळ होता.गगनबावडा तालुक्याची ओळख गगनबावडा गगनगिरी महाराज व पी.जी शिंदे या दोन नावांशी जोडली गेली होती.श्री शिंदे हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष होते.जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात तत्कालीन काळात त्यांचा राजकीय वर चष्मा राहिलेला होता. गगनबावडा तालुक्याच्या विकासासाठी उभारलेली शिक्षण संस्था वगळता अन्य तुलनात्मक विकासासाठी त्यांना फारसं योगदान देता आले नाही.मात्र,तालुक्यातील गावागावात पुढारी मोठे करण्याचे काम त्यांनी केले.त्यातले काही मोठे झाले तर काही “भामटे” झाले.”पिशवी भर” विकास सहकारी संस्था काढून.
मतदार संघातील गगनबावडा तालुक्यातील एकूण गावे 29 आहेत.ही गावे महसुली उत्पन्नातील आहेत. साळवन ते कोदे फाटा साळवन ते गगनबावडा,गगनबावडा ते धुंदवडे खोरी.अशा तीन खोरीमध्ये तालुक्याची विभागणी झाली आहे.गगनबावडा तालुक्याच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास करता,तालुक्यातील कोणत्या कोणत्या गावांमध्ये कोणत्या पद्धतीचा विकासाचा प्रोजेक्ट,सामाजिक आर्थिक शैक्षणिक व औद्योगिक राबवता येईल याबाबत लोकप्रतिनिधी स्थानिक तालुकास्तरावरील व जिल्हास्तरावरील यांच्याकडे फारच उदासीनता दिसून येते. गगनबावडा तालुक्याच्या विकास कामासाठी “गप्पा” मारणारे लोकप्रतिनिधीमुळे तालुक्यातील जनता गोंधळलेल्या अवस्थेत आहे.
त्यांची धार्मिक पद्धतीची “आंघोळ” गगनबावडा तालुक्याला एक दिवस जांभळी नदी तीरावरती बुडवणारी ठरणार आहे.कौटुंबिक पार्श्वभूमीचा वारसा “काँग्रेसचा” नदीत आंघोळ करून “हिंदुत्ववादी” होतातच कशी? सामाजिक शैक्षणिक आर्थिक व औद्योगिक विकास कामाचं कुठलंही नियोजन नसल्यामुळे गगनबावडा तालुक्यातील तरुण नैराशीच्या छायेत आहेत.बेकारी,हाताला काम नाही रोजगार नसल्यामुळे अनेकांची थांबलेली लग्न.
गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना कळणार कधी असा प्रश्न तालुका वासियांना पडला आहे.गगनबावडाच्या पोलीस ठाण्यातीलठाणे अंमलदार ‘अभयारण्यातील’ एखाद्या पाळीव पोसलेल्या “वाघासारखा”नुसताच बसून आहे.”डायरी”वरती नव्याने येणाऱ्या तक्रारीची वाट बघत.
गावागावात विकली जाणारी खुलेआम देशी,विदेशी कोकणातील दारू विकली जाते.हाताला काम धंदा नसल्यामुळे अनेकजण आसळज,गगनबावड्याच्या ठिकाणी मटका राजरोस खेळताना दिसतात.निवड्याचे संदीप पाटील यांचा या संदर्भात तक्रारी करून घसा कोरडा पडला.घरदार,कुटुंब,उध्वस्त झाली.मात्र,पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदारला दादा कोंडके यांच्या मराठी चित्रपटातील गाण्यासारखं “हवालदार” तुम्ही डायरीवर केस नाही लिवली! असं विनोदी गाणं ऐकवायची वेळ येऊन ठेपली आहे.पुष्पा चित्रपटामुळे नव्याने काही तयार झालेले पुष्पा.पुन्हा एकदा जंगलातील वनसंपत्तीची तस्करी करू लागले आहेत.