
मकर संक्रांत : नवचैतन्य, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक मूल्यांचा उत्सव
दैनिक वृत्तवेग परिवार
मकर संक्रांत हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण असून तो सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाशी संबंधित आहे. या दिवसापासून उत्तरायणास प्रारंभ होतो. सूर्याची उष्णता वाढू लागते, दिवस मोठे होतात आणि निसर्ग नव्या ऊर्जेने सजतो. कृषीप्रधान भारतात या बदलाचे विशेष महत्त्व असून शेतकऱ्यांसाठीही हा काळ आशादायी मानला जातो.महाराष्ट्रात मकर संक्रांत साजरी करण्याची समृद्ध परंपरा आहे.
तिळगुळ वाटप करून आपुलकी, सौहार्द आणि सलोख्याचा संदेश दिला जातो. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या उक्तीतून सामाजिक सौहार्द जपण्याचे महत्त्व अधोरेखित होते. महिलांमध्ये हळदी-कुंकू समारंभ, विविध गोड पदार्थांची तयारी, तसेच पतंग उडविण्याची परंपरा या सणाला सामाजिक रंगत आणते.हा सण केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे प्रतीक आहे.

परस्पर सन्मान, सकारात्मक संवाद आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश मकर संक्रांत देते. बदलत्या जीवनशैलीतही आपल्या परंपरांचे जतन करणे आवश्यक असून असे सण समाजाला एकत्र आणण्याचे कार्य करतात.मकर संक्रांत हा निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा, नव्या संकल्पांची सुरुवात करण्याचा आणि जीवनात गोडवा टिकवून ठेवण्याचा प्रेरणादायी उत्सव आहे.
– दैनिक वृत्तवेग मुख्य संपादक : गणेश वायदंडे
