२६ जानेवारी… प्रजासत्ताक दिनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रि.पा.ई. (आ) सांगली जिल्हा यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन.

Spread the love

दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क:-

मिरज प्रतिनिधी-लखन लोंढे

आज दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने मिरज शहरातील विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व संविधानाची उद्देशिका पठण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे युवक सांगली जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म कांबळे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पोपटराव कांबळे, सांगली जिल्हा प्रसिद्धीप्रमुख योगेंद्र कांबळे, मराठा आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे, युवक मिरज शहर अध्यक्ष विक्रांत वाघमारे,संतोष कांबळे,हनुमंत कांबळे,राकेश शिकलगार, अशांत कांबळे,पवन कांबळे,राज काळे,अमर खरात,तुषार मोलमानके,शुभम चव्हाण,राहुल सोनवणे, यांचे सह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज २६ जानेवारी २०२५ रोजी भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाचे लेखक, महान विचारवंत, महा-विद्वान कायदे-पंडित, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरज शहरातील पूर्णाकृती पुतळ्यास दीप प्रज्वलन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सर्व भारतीय नागरिकांना रिपब्लिकन (आठवले) पक्ष यांचे वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना युवक सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय श्वेतपद्म कांबळे म्हणाले, २ वर्ष ११ महिने १८ दिवस, दिवस आणि रात्र अखंडितपणे अभ्यास करून सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून संपूर्ण लोकशाही वर आधारित भारतीय संविधानाची निर्मिती विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. आज ७६ वर्षे झाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी भारत देशास दिलेले संविधान अखंडितपणे कार्यरत आहे. भारतीय संविधानाने जनतेस स्वतःचे मूलभूत हक्क प्राप्त करून दिले आहेत. समता, बंधुता, न्याय याची रचना भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे महिलांसाठी प्रत्येक बाबींमध्ये विशेष कलमांची रचना करून महिलांचा सन्मान भारतीय संविधानाने केलेला आहे.

कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वेगवेगळी कलमे करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मातील जनतेला एकसमान न्याय भारतीय संविधानामध्ये दिलेला आहे. प्रजासत्ताक दिनी नव्हेच तर प्रत्येक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे स्मरण करणे गरजेचे आहे. शेवटी सर्व भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *